Thursday, May 9, 2013

पत्रकारितेतील करिअर संधी

एकविसावे शतक ' माहितीचे युग' म्ह्णून ओळखले जाते.आल्विन टॉफलर यांनी Future Shock या ग्रंथात जग तीन मोठया स्थित्यंतरांमधून पुढे जात विकसित झाले असे म्ह्टलेआहे. यातील पहिले स्थित्यंतर होते आदिम युगातून कृषी क्रांतीच्या युगात जाण्याचे. दुसरे स्थित्यंतर होते औदयोगिक क्रांतीचे आणि तिसरे  स्थित्यंतर आहे माहिती क्रांतीचे.
माध्यमांच्या क्षेत्रातील प्रगतीबाबत भारत नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे.भारतातील माध्यमे आणि रंजन उद्योग क्षेत्राची (मिडिया एण्ड इंटरटेनमेंट इंडस्ट्री ) प्रतिवर्षी 11 टक्के विकासदराने वाढ होत आहे.यापुढच्या काळात हा विकासदर 14 टक्केपर्यंत वाढून 2015 मध्ये या क्षेत्रातील गुंतवणूक 1,27,500 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज फिक्कीतर्फे 2011 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे (संदर्भः www.business-standard.com ).
पत्रकारिता हे सर्जनशीलतेला संपूर्ण वाव देणारे क्षेत्र आहे.या क्षेत्रात रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते.





एकविसावे शतक 'माहितीचे युग' म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे शेती, औद्योगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारा पत्रकार हा माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अफाट विस्तार झाला आहे. पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. आता छापील वृत्तपत्रे, रेडिओ पत्रकारिता, इंटरनेट पत्रकारिता, मोबाईल पत्रकारिता ही क्षेत्रे पत्रकारितेसाठी खुली झाली आहेत. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतातील माहिती व रंजन उद्योगाच्या क्षेत्राचा सरासरी १४ टक्के वार्षिक दराने विकास होतो आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुवर्णयुग' अवतरले आहे. पत्रकारितेच्या शिक्षणाला या माहिती युगात कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या सार्‍या प्रवाहांना कवेत घेणारा अभ्यासक्रम त्यासाठी निवडणे महत्त्वाचे असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तज्ज्ञांची समिती नेमून या सर्व बाबींचा विचार केला आणि एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम तयार केला. देशातील बहुतांश विद्यापीठात हा अभ्यासक्रम आता उपलब्ध आहे. सोलापूर विद्यापीठात मागील तीन वर्षांपासून एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला वाचनाची, लेखनाची व वेगळे काही करण्याची आवड असते, तो पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी पत्रकार होऊ शकतो. पत्रकारितेच्या या अभ्यासक्रमात बातमी कशी लिहावी यापासून रेडिओसाठी टेलिव्हिजनसाठी लेखन कसे करावे, माहितीपट कसे निर्माण करावे, चित्रपटविषयक पत्रकारिता कशी करावी, जाहिराती

कशा तयार कराव्या
, जनसंपर्काचे कार्य कसे करावे, इंटरनेट पत्रकारिता कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.
तंत्रज्ञानातील विकासामुळे वृत्तपत्रांची संख्या आणि खप वाढत आहे. रेडिओच्या क्षेत्रात एफ . एम. क्रांतीमुळे पत्रकारांना नोकरीच्या अमाप संधी खुल्या झाल्या आहेत. टेलिव्हिजन चॅनल्सची संख्या ४00 वर गेल्याने या क्षेत्रातही कुशल पत्रकारांसाठी सातत्याने संधी वाढत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्काने तर माणसाचे सारे विश्‍वच व्यापले आहे. कोणत्याही ज्ञानशाखेत, कार्यालयात, उद्योगात, जाहिरात, जनसंपर्काचे कार्य करू शकणार्‍या तज्ज्ञ पत्रकारांची वानवा जाणवते. शासनालाही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सशक्त माहिती यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले माहिती अधिकारी हवे असतात. इंटरनेट व मोबाईल पत्रकारितेने तर या क्षेत्रातील करिअर संधीत प्रचंड वाढ केली आहे.
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे.
डॉ. रवींद्र चिंचोलकर
मो. ९८६00९१८५५
-->













विचार
सोलापुरी













             





एकविसावे शतक  'माहितीचे युग' म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे शेती, औद्योगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारा पत्रकार हा माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अफाट विस्तार झाला आहे. पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. आता छापील वृत्तपत्रे, रेडिओ पत्रकारिता, इंटरनेट पत्रकारिता, मोबाईल पत्रकारिता ही क्षेत्रे पत्रकारितेसाठी खुली झाली आहेत. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतातील माहिती व रंजन उद्योगाच्या क्षेत्राचा सरासरी १४ टक्के वार्षिक दराने विकास होतो आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुवर्णयुग' अवतरले आहे. पत्रकारितेच्या शिक्षणाला या माहिती युगात कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या सार्‍या प्रवाहांना कवेत घेणारा अभ्यासक्रम त्यासाठी निवडणे महत्त्वाचे असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तज्ज्ञांची समिती नेमून या सर्व बाबींचा विचार केला आणि एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम तयार केला. देशातील बहुतांश विद्यापीठात हा अभ्यासक्रम आता उपलब्ध आहे. सोलापूर विद्यापीठात मागील तीन वर्षांपासून एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला वाचनाची, लेखनाची व वेगळे काही करण्याची आवड असते, तो पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी पत्रकार होऊ शकतो. पत्रकारितेच्या या अभ्यासक्रमात बातमी कशी लिहावी यापासून रेडिओसाठी टेलिव्हिजनसाठी लेखन कसे करावे, माहितीपट कसे निर्माण करावे, चित्रपटविषयक पत्रकारिता कशी करावी, जाहिराती कशा तयार कराव्या, जनसंपर्काचे कार्य कसे करावे, इंटरनेट पत्रकारिता कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.
तंत्रज्ञानातील विकासामुळे वृत्तपत्रांची संख्या आणि खप वाढत आहे. रेडिओच्या क्षेत्रात एफ . एम. क्रांतीमुळे पत्रकारांना नोकरीच्या अमाप संधी खुल्या झाल्या आहेत. टेलिव्हिजन चॅनल्सची संख्या ४00 वर गेल्याने या क्षेत्रातही कुशल पत्रकारांसाठी सातत्याने संधी वाढत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्काने तर माणसाचे सारे विश्‍वच व्यापले आहे. कोणत्याही ज्ञानशाखेत, कार्यालयात, उद्योगात, जाहिरात, जनसंपर्काचे कार्य करू शकणार्‍या तज्ज्ञ पत्रकारांची वानवा जाणवते. शासनालाही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सशक्त माहिती यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले माहिती अधिकारी हवे असतात. इंटरनेट व मोबाईल पत्रकारितेने तर या क्षेत्रातील करिअर संधीत प्रचंड वाढ केली आहे.
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे.
डॉ. रवींद्र चिंचोलकर
मो. ९८६00९१८५५


Saturday, April 13, 2013

परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता


               भारतीय पत्रकारितेचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या वृत्तपत्रात केलेले लेखन आणि संपादन ही कामगिरी अभूतपूर्व आहे.त्यांची पत्रकारिता समाज परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली पत्रकारिता होती. लेखणीच्या सामर्थ्यातून क्रांती घडू शकते हे त्यांच्या पत्रकारितेने सिध्द केले.असे यश भारतात अपवादाने एखादयाच संपादकाला लाभले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने सतत नवविचारांची पेरणी करण्याचे कार्य केले, समाजातील जातीभेदाचे तण नष्ट करुन परिवर्तनाची पहाट निर्माण करण्यासाठीच त्यांची लेखणी सतत संघर्ष करीत होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक व विचारपूर्वक उडी घेतली. 1918 साली   मॉंटेग्यू सुधारणा अमलात आणण्याबाबत पाहणी करण्यास साऊथबरो कमिशनची नेमणूक करण्यात आली होती.भारतीयांना काही राजकीय हक्क मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची हीच वेळ आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणले. वर्षानुवर्षे मूक राहिलेल्या समाजाने भीड सोडून आरोळी ठोकण्याची हीच वेळ  हे त्यांना समजले. त्यामुळे ‘ अर्धे देत नाही तर पूर्ण घेऊ’ अशी गर्जना करत  31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक ‘ हे पहिले वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांनी सुरु केले

 ‘’ काय करु आता धरुनीया भीड  

  निःशंक हे तोंड वाजविले 

  नव्हे जगी कोणी ,मुकियांचा जाण 

सार्थक लाजून नव्हे हित’

                                                                                              
ही संत तुकारामांच्या अभंगातील ओवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’ या पहिल्या वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकात अग्रभागी ठळकपणाने छापलेली असे.त्यातूनही हीच भावना व्यक्त होते. मूकनायक वृत्तपत्र सुरु करताना त्याची जाहिरात त्यांनी केसरी या वृत्तपत्राकडे पाठविली , पण जागा नाही असे कारण सांगून ती जाहीरात केसरीने परत पाठविली.यावरुन केसरीकारांची मनोवृत्ती दिसून येते.मूकनायक सारख्या वृत्तपत्रांची वाट किती बिकट होती हे देखील यातून जाणवते.
मूकनायक फार काळ टिकाव धरु शकले नाही मात्र परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले.या वृत्तपत्राने डॉ. आंबेडरांच्या विचारांना आणि चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले.त्यानंतरच्या कालखंडात चलवळ जोर धरु लागली. जातीच्या नावाखाली  मंदीरात नाकारल्या जाणार्‍या प्रवेशाविरोधात तसेच सार्वजनिक पाणवठयावर केल्या जाणार्‍या मज्जावा विरोधात आंदोलनाने जोर धरला. याच कालखंडात 3 एप्रिल 1927 ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले.जातीच्या नावाखाली सवर्णांनी बहिष्कृत केलेल्या समाजाच्या वेदना डॉ. आंबेडक्रांनी या वृत्तपत्रातून व्यक्त केल्या.या वृत्तपत्राला जवळपास तीन वर्षाचे आयुष्य लाभले. आर्थिक अडचणींमुळे अखेरीस हे वृत्तपत्र बंद करावे लागले.मात्र या वृत्तपत्राने या कालावधीत केलेली कामगिरी इतिहासात स्वतंत्र नोंद करुन ठेवण्याइतकी महत्वपूर्ण होती.
                 समाजातील जातीभेद नष्ट होऊन समता प्रस्थापित व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी  24 नोव्हंबर 1930 रोजी ‘जनता’ हे वृत्तपत्र त्यांनी सुरु केले. हे वृत्तपत्र केवळ दलित जनतेनेच नव्हे तर दलितेतर जनतेनेही वाचावे अशी त्यांची अपेक्षा होती..यात त्यांनी सर्वसमावेशक विषयांवर लेखन केले.हे वृत्तपत्र 25 वर्षे सुरु होते.विचारांचा पराभव विचारांनीच केला पाहिजे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे सूत्र होते.याच भावनेतून त्यांनी सतत विचारांची लढाई केली. त्यांच्या लेखन सामर्थ्याविषयी ‘ निजाम विजय’ या वृत्तपत्राने म्ह्टले होते की ‘’ लेखकाची भाषा अत्यंत जोरदार सडेतोड व केवळ निर्भेळ सत्याशिवाय कशाचीही दरकार न करणारी अशी आहे व हेच धोरण पत्रकर्ते जोवर कायम ठेवतील तोवर ते आपले उद्दीष्ट सिध्दीस नेण्याचे यश कायम मिळवतील’’.त्याप्रमाणे खरोखरीच डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेने भारतात नवा इतिहास रचण्याचे कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करुन बुध्द धम्माचा स्वीकार केला तेव्हा जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुध्द भारत असे करण्यात आले.
                डॉ. गंगाधर पानतावणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे वेगळे वैशिष्टय सांगताना लिहितात ‘’त्या काळातल्या कोणत्याही एक मराठी वृत्तपत्रांना जी बाब करता आली नव्ह्ती ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविली ती म्हणजे ती म्ह्णजे अस्पृश्य समाजाला त्यांनी आपल्या लेखनीने विचार प्रवृत्त, कर्तव्यसन्मुख व अंतर्मुख बनविले.एवढेच नाही तर स्वतःच्या समाजापलिकडे पाहण्याच्या दृष्टीचा परीचयही त्यांनी आपल्या लेखणीने घडविला’’.
       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीव्दारे भारतातील राजकीय,सामाजिक ,आर्थिक, शेती, शिक्षण, सहकार, परराष्ट्र व्यवहार  यासह विविध विषयांवर व्‍तापत्रातून लेखन केले.दलित समाजाला जागे करण्याचे आणि त्यांना आपल्या हक्कांची जाण३व करुन देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या पत्रकारितेने केले .डॉ. आंबेडकरांच्या प्रत्येक वृत्तपत्राची वेगळी भूमिका होती. त्यांच्या प्रत्येक वृत्तपत्राचे नावही वैशिष्टयपूर्ण होते. त्यांच्या वृतापत्रात काधीही च्छोर, उथळ लेखनाला थारा देण्यात आला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने हजारो व्यक्तींच्या जीवनात नवविचारांचे स्फुल्लिंग निर्माण करण्याचे कार्य केले.
                        ज्या समर्थ व जातीविरहित भारताचे चित्र डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून रेखाटले ते मात्र पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही हे मान्य करावे लागेल.आजच्या काळात राजकीय स्वार्थासाठी जातीपातींच्या अस्मितांना अधिक चेतविण्याचे काम घडत आहे. त्यामुळे जातीयवाद कमी होण्याऐवजी वाढतो आहे.वेगवेगळी रुपे देऊन जातीपातीचे बंध आणखी घट्ट केले जात आहेत. त्यामुळे जातीअंताचा लढा कायमच आहे.निःस्वार्थपणे कार्य करणारे राजकीय व सामाजिक नेते आता कोणत्याच पक्षाकडे उरले नाहीत. केवळ समाजहितासाठी पत्रकारिता करणारे संपादकही आता नाहीत नि त्यांच्या लेखणीत समाज बदलविण्याचे सामर्थ्यही नाही . एकंदरीत डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठित भारताचे स्वप्न अदयाप अपूर्णच आहे.

Sunday, March 24, 2013

National conference on Media and Society


About Solapur City

                        SOLAPUR is one of the important districts of Maharashtra State in India. It is located in the southern part of Maharashtra. The famous religious places like Pandharpur and Akkalkot are in Solapur district only. Solapur has its own history. It is known for Textile industry. Solapur is transport hub connecting Maharashtra, Karnataka and Andhra Pradesh. It is well connected by Road and Rail to major districts and cities. Solapur city is 250 kms away from Pune
 About University

Solapur University was established on 1st August 2004 .The formation of the university at Solapur was a long cherished desire of the people of this region. Within a brief span of 8 years the university has taken significant stride towards excellence .Solapur University has been established to cater the needs of over 60,000 student’s community. The university is poised for an ambitious growth. The University is now a hub of various academic activities..In Solapur University there are 7 schools and 21 innovative courses are offered to the students.

About School of Social Sciences
                    The School, since its inception in the year 2008, has been wedded to the mission objective “Engage Social Sciences as Science” in comprehending societal processes.
                    Keeping in view the reforms in higher education that are pervading the country especially, in the context of globalization, the School of Social Sciences offers interdisciplinary learning. Unlike the conventional teaching, the School emphasizes for the transformation of personality of the students in addition to curricular teaching. The School intends to engage social sciences to understand and interpret social processes and suggests appropriate policy interventions. To meet this objective, the School adopts innovative teaching methods, which involve strong theoretical orientation supported by skill development and practical application. Workshops, seminars, debates and group discussions are the regular features of students’ learning. The courses offered under the aegis of the School include Fieldwork and Practical as integral parts of the curriculum. 
                       The School has four Departments viz., Ancient Indian History, Culture & Archaeology; Journalism and Mass Communication; Rural Development; and Applied Economics. The Departments offer two- year full time Masters Courses in the subjects concerned.
  Department of Journalism and Mass Communication
                      The expansion of mass media and communication in the country has created an unprecedented demand for media professionals to meet the growing needs of media industry. To meet the demand for skilled manpower the Department has introduced two- year M.A. course in Journalism and Mass Communication from the academic year 2009-10. The main objective of this course is to enable students to acquire technical skills and writing and communication skills required by the media houses. Students are taught theories and concepts of Mass Communication as per the UGC guidelines. Successful students would make career in teaching, research and as journalists in Print, Electronic Media and Corporate Sector. The students of the previous batches got excellent placements in the press in and around Solapur.

About  Seminar
                     The dawn of 21st century has been endorsed as an era of communication media. The advancement in communication and information technology has facilitated the process of globalization and made this globe, a village. While reducing physical and social distance between societies, these processes have delegated new roles and responsibility to media to address the societal needs and engage in bringing out a desirable change and desirable society. In the pursuit of this new role, the media and information technology have to prioritize the vital social issues that are confronting society and set an agenda of action for appropriate interventions. A wide array of issues which need urgent attention today range from social inequalities to sustainable development; illiteracy, ignorance to knowledge society; and economic recession to ecological concerns.  In all these spheres the functions of media and communication are intrinsic and intricate. Against this backdrop, this seminar intends to provide a platform to articulate this new roles and functions for the media houses and to promote building of an egalitarian social order. The central objective of this seminar is to provide a stage for the activists, academic fraternity, media professionals, officials and intellectuals concerned with media and society, to deliberate on the themes and sub-themes of the seminar and set an agenda for the future action. Also, it is expected that the deliberation of this seminar will culminate into policy suggestions for implementation. The paper presenters are expected to contribute their papers on the following sub-themes which are indicative. Scholars are encouraged to contribute papers and case studies on any other related themes of the seminar.
Theme and Sub-themes- Media and Society
1.      Social Exclusion and Media

2.      Economic Issues and Media

3.      Developmental Issues and Media

4.      Environmental Issues and Media

5.      Gender Issues and Media

6.      Communal Issues and Media

7.       Tourism Development and Media

Submission of Paper.

Interested participants/authors should submit electronically full paper (on relevant themes) in MS WORD document, with a font size of 12, to email: sssms2013solapur@gmail.com . The paper must contain the title, name of the author, email address and contact details

Important Dates

Submission of Abstract  (500 words)                                   : 5th April, 2013
Notification of acceptance of abstract                                  : 8th April, 2013
Full paper submission                                                           : 15th  April, 2013
      

Registration Fees
Academicians                                                        - Rs 1000/-
Ph.D  Students/ Media Persons                             - Rs 500/-
Students                                                                  -Rs 250/-


Registration Fee Includes
·         Seminar Participation certificate and Abstract book.
·         Conference Kit, Breakfast, Lunch, High Tea and Dinner.



Registration and Payments

Payment by Demand Draft:

1.      Registration Fees should be paid by Demand Draft drawn in the favour of Finance and Account officer, Solapur University,Solapur payable at Solapur


Payment by Cash :

 Registration fee can be paid in cash at School of Social Sciences Solapur University, Solapur


For Seminar Details visit Website:         www.su.digitaluniversity.ac.in


1.      Convener                                   :    Dr. E.N.AshokKumar
                                                         Director
                                                         School of social Sciences

2.      Co-ordinator                             :   Dr. G.S. Kamble

                                                                      9850248094
        
3.      Organizing Secretary               : Dr. R.B. Chincholkar

                                                       9860091855

4.      Organising Committee :
        
1.      Dr.C.S.Bhanumate
2.      Dr.M.J Patil
3.      Shri P.G.Vhankade
4.      Shri P.N. Kolekar
5.      Shri D.B. Gadling(9373750444)
6.      Smt S.K. Giri

Correspondence Address:
To,
The Director
(conference convener)
School of Social Sciences
Solapur University, Solapur-413255
PBX No. 0217-2744771 – Ext- 159











Monday, February 18, 2013

नारदमुनींना हवी पेन्शन


समुद्राच्या मध्यभागी भगवान विष्णु शेषशय्येवर आरामात पहुडले होते.यांच्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ होते.त्याचवेळी तिन्ही लोकी संचार करणारे आदय पत्रकार नारदमुनी यांचे आगमन झाले.नारदमुनींनी धोतर, गळ्यात माळ असा नेहमीचा पेहराव केलेला होता आणि त्यांच्या डाव्या हातात वीणा होती.भगवान विष्णु यांना पाहताच नारदमुनींनी नतमस्तक होत हात जोडून प्रणाम केला आणि म्ह्णाले ‘’ नारायण !नारायण ! ‘’.
भगवान विष्णुंनी प्रसन्न मुद्रेने नारदांकडे पाहिले आणि ते म्हणाले ‘’ वत्सा, नारदा.तुला पाहून खूप छान वाटले.मला सांग पृथ्वीतलावर तुझी पत्रकारिता कशी सुरु आहे?’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’ नारायण !नारायण !, भगवन, त्यासंदर्भात बोलण्यासाठीच मी आज आपणाकडे आलो आहे.काहीही करुन मला पेन्शन मंजूर करा, आता पत्रकारितेच्या व्यवसायातून निवृत्ती घेण्याचा विचार मी करतो आहे.’’.
नारदाचे बोलणे ऐकून भगवान विष्णुंना खूप आश्चर्य वाटले.ते म्ह्णाले’’ नारदा, काय झाले, असा विचार तुझ्या मनात आला तरी कसा?’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’भगवन, तरुण पत्रकारांकडून सुरु असलेल्या स्पर्धेत टिकाव लागेल असे मला वाटत नाही.’’
भगवान विष्णु म्ह्णाले ‘’नारदा, तुझ्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराने नवख्या पत्रकारांची धास्ती घेण्याची काय आवश्यकता आहे?.’’
नारदमुनी म्ह्णाले ‘’भगवन,पृथ्वीतलावर आता पत्रकारिता शिल्लकच राहिलेली नाही.आता पत्रकारितेच्या नावाखाली जे काही केले जाते ,ती आहे जादू आणि दुर्देवाने मी जादू कधीच शिकलो नाही.पृथ्वीतलावर आता चित्रवाणी नावाचे नवे माध्यम आले आहे ,ते माझ्या काळात नव्ह्ते.ते खरेच जादुई माध्यम आहे. यात लोकांना माहिती देण्याचे काम करावे लागत नाही तर, सनसनाटी निर्माण करुन जनभावना चेतविणे व जनमत तयार करण्याचे काम करावे लागते.भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, दिल्लीतील बलात्कार प्रकरण, भारतीय सैनिकांचे शीर कापले जाण्याचे प्रकरण ही यासंदर्भातली काही उदाहरणे आहेत.’’
बहुतांश वृत्तवाहिन्या वाढीव टीआर्पीसाठी आतुरलेल्या आहेत.लोकांच्या भावनांना भडकावून, विविध मुद्दयांसाठी रस्त्यावर येण्यास त्यांना उद्युक्त करण्यात त्यांना धन्यता वाटते आहे.यासाठी अर्धसत्य सांगणे, खोटया गोष्टी पसरविणे,सनसनाटी निर्माण करणे, उथळपणे विषयांची मांडणी करणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत.चर्चा करण्यासाठी आणि मते घडविण्यासाठी अशा तज्ञांना निमंत्रित केले जाते, जे अगदी टोकाची मते व्यक्त करतात. निवेदकही सरळ व वस्तुनिष्ठ बातमी देण्याऐवजी फिरवून बातमी देतात. ज्यांना मते व्यक्त करण्यास निंमंत्रित केले आहे ते आपणास हवे तसे मत मांडत नाहीत असे वाटल्यास मध्येच हस्तक्षेप करतात, अनेकदा त्यांना बोलूच देत नाहीत.
काही महिन्यापूर्वी बहुतांश वाहिन्यांनी  अण्णा हजारे हे जणू काही नवे मसीहा आहेत अशी हवा निर्माण करुन ते देशाचे तारणहार ठरतील असा प्रचार केला. (अण्णा हजारे यांच्या विधानांचा बारकाईने अभ्यास केल्यास जाणवते की त्यांच्याकडे शास्त्रीय कल्पना नाहीत ).हमेलीन शहरातला तो बासरीवाला जादूगार जसा बासरीच्या सुरावटीची जादू पसरवून मुलांना मोहीत करतो तसे हे सारे घडले.ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरुन हे घडले तो मुद्दा आणि ज्यांच्यामुळे लोक जमा झाले ते अण्णा हजारे आता कुठे आहेत?एकाएकी देशातला भ्रष्टाचार 0.1 टक्केंपेक्षा कमी झाला की  काय? नाही, तसे मुळीच नाही ,तर आता हा मुद्दा वाहिन्यांना टीआरपी वाढविण्यास उपयोगी ठरत नाही, त्यामुळे वाहिन्या आता याकडे लक्ष देत नाहीत.
त्यानंतर दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरुन या वाहिन्यांनी दोन महिने तरुण पिढीची माथी भडकविली आणि त्यांना रस्त्यावर व जंतरमंतरवर आंदोलन करायला भाग पाडले. बलात्कार प्रकरण हाच जगातला एकमेव प्रश्न आहे,दारिद्रय, भूक, बेरोजगारी, कुपोषण, महागाई, आरोग्याची हेळसांड, शेतकर्‍यांच्या आत्महत्या यासारख्या प्रश्नांना  आता काही महत्वच नाही अशा पध्दतीने हे लोक वागत होते.
बलात्कार प्रकरणाची धग जरा कमी होताच या वाहिन्यांना भारतीय जवानांचे शीर पाकिस्तानी सैनिकांनी कलम केल्याचे कथित प्रकरण हाती मिळाले.पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांनी याप्रकरणी वस्तुनिष्ठ चौकशी करा अशी विनंती केली. त्याकडे दुर्लक्ष करुन वाहिन्यांनी युध्दज्वर वाढवायला सुरुवात केली.वातावरण तापवण्यात आल्याने लोकांची माथी भडकली. पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना मारहाण करणे व मायदेशी परत पाठविणे हे प्रकार यातून घडले.वृध्द व्यक्तींसाठी व्हिसा देण्याबाबत करार करण्यासाठी होणारी चर्चाही यात लांबणीवर पडली.
भगवान विष्णु म्ह्णाले ‘’नारदा,हे सारे इलेक्टॉनिक वाहिन्यांबद्दल सांगितलेस, मुद्रित माध्यमांची म्ह्णजे वृत्तपत्रांची काय स्थिती आहे?’’.
नारदमुनी म्ह्णाले’’ नारायण ! नारायण !, वृत्तपत्रांबद्दल काय सांगावे? आताची वृत्तपत्रे म्ह्णजे नुसत्या जाहिराती.बहुतांश मोठया वृत्तपत्रात बातम्या तिसर्‍या पानावर सुरु होतात.पहिल्या दोन पानात जाहिरातीच असतात.ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली टीव्ही वाहिन्या जो गाजावाजा करतात, त्यामुळे मुद्रित माध्यमे नेहमी मागेच राहतात.पेड न्यूजच्या संदर्भात तर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमे सारखीच, याला झाकावा नि याला काढावा, त्यापेक्षा यासंदर्भात काही न बोललेले चांगले.’’
शेवटी अगदी काकुळतीला येऊन नारदमुनी म्ह्णाले’’ भगवन, काहीही करा, पण मला या थोर भारतीय पत्रकारांच्या सानिध्यातून  बाहेर काढा , अन्यथा मला वेड लागेल.मला ताबडतोब पेन्शन मंजूर करा.’’.
भगवान विष्णु ‘’तथास्तु.’’ म्ह्णाले व अंतर्धान पावले.
नारदमुनी आता हिमालयातल्या एका गुहेत ध्यानधारणेत मग्न आहेत आणि निर्वाणाकडे डोळे लावून बसले आहेत.
मूळ इंग्रजी लेख - मार्कंडेय काटजू, अध्यक्ष, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली.
मराठी अनुवादः रवींद्र चिंचोलकर, सोलापूर

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...